नांदेडमधील सरकारी रुग्णालयातल्या मृत्यूतांडवाची मुंबई हायकोर्टाकडून स्वतःहून दखल
मनुष्यबळाची कमतरता, औषधांची टंचाई आणि त्यामुळे असे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांना सांगितले. नेमकी घटना काय आणि कशी घडली, या साऱ्याची मी माहिती घेतो आणि उद्या प्राथमिक म्हणणे मांडतो, असे सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.